ही घटना 1940 सालची आहे. लहानपणीच आपल्या मातापित्यांच्या म्रूत्यूमुळे अनाथ झालेला एक 14 वर्षे वयाचा कर्नाटक राज्यातील एका लहानशा खेडेगावातील मुलगा बगळूर या शहरात शिक्षण घेत होता. गरिबीची परिस्थिती असल्याने तो दिवसभर वाचनालयातच बसुन अभ्यास करायचा आणी रात्री उशिरा वसतीगृहात झोपायला जायचा. त्याच्या शिक्षकांनी त्याची बुद्धीमत्ता आणि हलाखीची परिस्थिती पाहून त्याच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था वार पद्धतीने केली होती. तो सोमवार ते शनिवार प्रत्येक शिक्षकांकडे आठवड्यात एकदा याप्रमाणे रात्री जेवण घ्यायला जायचा आणि रविवारचा दिवस बाहेर काहीतरी खाऊन घालवायचा.
तो असाच एकदा सोमवारी रात्री जेवणासाठी जात असतांना एका माडीवरून त्याला गायनाचे स्वर ऐकू आले. त्या जादुई स्वरांनी तो मुलगा आकर्षित झाला आणि एका घराच्या माडीवर चाललेल्या त्या गायनाच्या मैफिलीत जाऊन बसला.मंध्यम वयाची एक तयार गायिका अतिशय तन्मयतेने भान हरपून शास्त्रीय संगीतातील रागदारी गात होती. सार्या दुनियेला विसरून, डोळे मिटून ती जादुई स्वरांची गायिका आपल्याच धुंदीत गात होती. सर्व मैफील देखिल स्वरांच्या त्या आविष्कारांत तल्लीन झाली होती. त्या गायिकेच गाण ऐकून या 14 वर्षे वयाच्या मुलाच्या डोळ्यातून टपटप करत अश्रू वाहू लागलेत. जणूकाही त्याच्या मनातला कितीतरी वर्षांपासूनचा भावनांचा बांध या स्वरातून फुटला होता. तो मुलगा काल रविवार असल्याने जेवला नव्हता आणि आज सोमवारी केवळ दिवसातून एकदाच मिळनार रात्रीच जेवण देखिल या मैफीलीपाई घालवून बसला होता. मैफील संपली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. मुलगा उठला त्याने त्या गायिकेच नाव एकाला विचारल आणी माडीवरून खाली उतरून एकटाच वसतिगृहाच्या दिशेने चालू लागला. भुक त्याच्या पोटात मावत नव्हती परंतु कितीही रुचकर अंन्न खाल्ले तरी मिळनार नाही अशा समाधानाने त्याचे मन भरून पावले होते.
पुढे अनेक वर्षे उलटलीत तो मुलगा मोठा होऊन एक प्रतिथयश लेखक झाला. आपल्या बालपणीच्या या प्रसंगाला आपल्या आत्मचरित्रात मांडताना तो लेखक म्हणाला "त्या रात्री मी मैफिलीत रडत होतो कारण मला असे वाटले की माझी मेलेली आई माझ्यासाठी गात आहे". एवढा उत्कट तो स्वर अविष्कार होता.
तो मुलगा म्हणजे भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यीक *एस. एल. भैरंप्पा* हे होत आणि त्या रात्री मैफीलीत गाणार्या त्या गायिका होत्या *गंगूबाई हनगळ* ज्याचीं 21जुलै या दिवशी पुण्यतिथी असते
.
अशा या महान गायिकेला कोटी कोटी प्रणाम
तो असाच एकदा सोमवारी रात्री जेवणासाठी जात असतांना एका माडीवरून त्याला गायनाचे स्वर ऐकू आले. त्या जादुई स्वरांनी तो मुलगा आकर्षित झाला आणि एका घराच्या माडीवर चाललेल्या त्या गायनाच्या मैफिलीत जाऊन बसला.मंध्यम वयाची एक तयार गायिका अतिशय तन्मयतेने भान हरपून शास्त्रीय संगीतातील रागदारी गात होती. सार्या दुनियेला विसरून, डोळे मिटून ती जादुई स्वरांची गायिका आपल्याच धुंदीत गात होती. सर्व मैफील देखिल स्वरांच्या त्या आविष्कारांत तल्लीन झाली होती. त्या गायिकेच गाण ऐकून या 14 वर्षे वयाच्या मुलाच्या डोळ्यातून टपटप करत अश्रू वाहू लागलेत. जणूकाही त्याच्या मनातला कितीतरी वर्षांपासूनचा भावनांचा बांध या स्वरातून फुटला होता. तो मुलगा काल रविवार असल्याने जेवला नव्हता आणि आज सोमवारी केवळ दिवसातून एकदाच मिळनार रात्रीच जेवण देखिल या मैफीलीपाई घालवून बसला होता. मैफील संपली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. मुलगा उठला त्याने त्या गायिकेच नाव एकाला विचारल आणी माडीवरून खाली उतरून एकटाच वसतिगृहाच्या दिशेने चालू लागला. भुक त्याच्या पोटात मावत नव्हती परंतु कितीही रुचकर अंन्न खाल्ले तरी मिळनार नाही अशा समाधानाने त्याचे मन भरून पावले होते.
पुढे अनेक वर्षे उलटलीत तो मुलगा मोठा होऊन एक प्रतिथयश लेखक झाला. आपल्या बालपणीच्या या प्रसंगाला आपल्या आत्मचरित्रात मांडताना तो लेखक म्हणाला "त्या रात्री मी मैफिलीत रडत होतो कारण मला असे वाटले की माझी मेलेली आई माझ्यासाठी गात आहे". एवढा उत्कट तो स्वर अविष्कार होता.
तो मुलगा म्हणजे भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यीक *एस. एल. भैरंप्पा* हे होत आणि त्या रात्री मैफीलीत गाणार्या त्या गायिका होत्या *गंगूबाई हनगळ* ज्याचीं 21जुलै या दिवशी पुण्यतिथी असते
.
अशा या महान गायिकेला कोटी कोटी प्रणाम
Good ...its give me a remembrance of great moment of book reading ....
ReplyDeleteGood keep it up...
भैरप्पांचे आत्मचरित्र अतिशय प्रेरणादायी आहे। छान लिहिले आहे।
ReplyDelete