Friday 24 July 2020

चिनी वस्तूंवरील भारताची बंदी

चिनी वस्तूंवरील भारताची बंदी ही चीनला योग्य प्रत्युत्तर आहे का की ते आंधळ्या देशभक्ती च्या नादात उचललेल अव्यवहार्य आणि मूर्खपणाच पाऊल आहे...
लेखन : विनय पाटील
या दोघेही गोष्टी लॉजिकल आहेत.
आपली उत्पादने स्वस्त नाहीत म्हणून लोक ती विकत घेत नाहीत म्हणून चीन निर्मित वस्तू संपूर्णपणे टाळणे ओपन मार्केट आणि ग्लोबलायझेशनच्या जगात थोडं कठीण वाटतं सोबतच जपानी लोकांमध्ये असलेली देशभक्ती आणि विजिगीषू वृत्ती आपल्यात यायला हवी ज्यात थोडं महाग असल तरी चालेल परंतु आपल्याच देशातील उद्योगांना आणि माणसांच उत्पादनांच समर्थन करायचे.
परंतु खरं सांगू प्रश्न अतिशय मुळाशी येऊन पोहोचतो तो आपल्या नैतिकतेशी. आज चीन हा भारतापेक्षा सर्वच बाबतीत उजवा आहे (अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही सोडून) परंतु मग आपण चीनसारख्या वस्तू का बनवू शकत नाहीत आपल्या इंजिनिअर्सचा सगळ्या जगात बोलबाला असताना आपल्याकडे प्रोडक्शन का कमी आहे. माझ्या ओळखीचे एक उद्योजक आहेत ते म्हणतात चीनमध्ये आपल्याकडील रोजगाराच्या तीन पट रोजगार कामगारांना मिळतो तरीसुद्धा जगातील कंपन्यांना चीनमध्येच उत्पादन केलेल्या वस्तू परवडतात कारण त्यांच्या लोकांची कामगारांची उत्पादन क्षमता प्रचंड आहे सोबतच जबरदस्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रांसपोर्टेशन च्या सुविधा या सर्वांमुळे भारतीय काय पण अमेरिकेतल्या कितीतरी कंपन्या जसे की एप्पल , ॲमेझॉन ही आपली प्रोडक्स चीन मधून बनवून घेतात तर भारतात ? एक किस्सा सांगतो धुळे शहरा जवळ मागच्या पंधरा वर्षापासून नरडाणा लगत एक एमायडिसी येऊ घातलेली आहे. प्रचंड मोठी जागा आणि महत्त्वकांक्षी प्रकल्प या योजनेसाठी दिला गेला आहे. पाणी आहे, ट्रांसपोर्टेशन आहे परंतु एमआयडीसीचा काही विकास होत नाहीये. कारण जसे ही कुठली कंपनी मोठी व्हायला लागते तसेच स्थानिक मजूर कामगार लोकप्रतिनिधींना घेऊन जाऊन कधी पगार वाढीसाठी, कधी कामाच्या वेळा कमी करण्यासाठी, तर कधी भूमिपुत्रांनाच नोकरी देण्यासाठी आंदोलन करतात याला कंटाळून कितीतरी कंपन्या बंद पडल्यात किंवा थेट गुजरात मध्ये शिफ्ट झाल्यात आणि खानदेशात बेरोजगार तरुण तसेच राहिलेत याला जबाबदार आपली मानसिकताच नाही काय.हेच थोड्याफार फरकाने संपूर्ण भारतात होते आहे. सोबतच चीन मधून येणारा माल हा प्रचंड कस्टमच्या भ्रष्टाचारा सोबत भारतात येतो यात अधिकार्यांपासून तर स्थानिक दुकानदार पर्यंत सर्व लोक लोणी खातात शिवाय ग्राहकांनाही तो स्वस्तात मिळतो पण पैसा बुडतो तो देशाचा म्हणजे आपल्याच सगळ्यांचा हे आपल्याला कधी कळेल.
म्हणून सगळ्यात आधी राष्ट्रवाद वाढायला हवा
आपल्या भाषेपासून तर अस्मिते पर्यंत आणि नैतिक ते पासून तर व्यापार कौशल्या पर्यंतच शिक्षण शाळांमधून दिलं जायला हवं तेव्हा येणारी पिढी ही राष्ट्रवादाने आणि नैतिकतेने भरलेली असेल आणि भारत सामर्थ्यवान बनू शकेल. आज आपण चीन विरोधी देशभक्तीच्या पोस्ट टिक टॉक च्या चिनी एप'मधूनच पाहतो. तर काही ठिकाणी बँन चाईना झेंडे देखील मेड इन चायना असतात.
प्रत्येक भारतीयाला काही गोष्टी कंपल्सरी केल्याशिवाय सोडवत नाहीत हो. सॉक्रेटिस म्हणतो कधीकधी थोड्याप्रमाणातील हुकूमशाही ही लोकशाहीच्या ओव्हरडोस पेक्षा बरी असते . नाही मग लोकशाहीला सुखावलेले आणि गरिबांचा खरोखर कळवळा असलेले सरकार कसं बेजबाबदार आहे याचा सूर आवळतीलच. शिवाय प्रत्येक जातीचे धर्माचे वेगवेगळ्या नेते वेगवेगळी मते मांडतील खास आपल्या लोकांच्या फायद्यासाठी. परंतु माणसाला म्हणा की राष्ट्राला म्हणा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी , स्वाभिमानाने जगण्यासाठी, आपल्यावरील अन्याय सहन न करण्यासाठी, सुदृढ , ताकदवर असणं गरजेचं असतं आणि सुदृढतेसाठी शिस्त गरजेची असते जी प्रसंगी कठीण निर्णय घेऊनच बाणवावी लागते. सगळ्यात महत्वाचा म्हणजे
देशाने काय करावे यापेक्षा मी काय करतो आहे. नैतिकतेने जगतो आहे, कर प्रामाणिकपणे भरतो आहे, सार्वजनिक स्वच्छता बाळगतो आहे, देशासाठी मरणाऱ्या सैनिकांच्या मुलांसाठी काही दानधर्म करतो आहे, की फक्त व्हाट्अप फॉरवर्ड आणि फेसबुक पोस्ट वाचतो आहे आणि पुढे पाठवतो आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची...
कारण इंग्रजीत म्हण आहे
When you are not a part of solution then you are part of problem...
विनय पाटील... मुक्तछंद

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...