Friday 23 November 2018

इन्सान खतरे मे है...

    लेखन : विनय पाटील
तुम्ही राजश्री प्रोडक्शन चे गीत  गाता चल, हम आपके है कोण, हम साथ साथ है, विवाह हे सिनिमे  पहिले असतील  तर
त्यात एकसारखे कथानक तुम्हाला दिसेल. संपूर्ण चित्रपटात अतिशय आनंदच वातावरण असत, सारखे कुठले न कुठले सोहळे साजरे होत असतात, एखाददुसर पात्र आणि अप्रिय घटना वगळता सारेच प्रेम आणि संस्कारांची मूर्तिमंत उदाहरण असतात. आणि चित्रपटातील ती अप्रिय घटना अतिशय थोड्या प्रयत्नाने दूर होते आणि शेवट पुन्हा गोड होतो. या चित्रपटांचा गोडवा एवढा असतो कि आपल्याला डायबेटिस होतो की काय अशी शंका यावी. या सर्वांची  आठवण मला हल्ली भारतीय टेलिव्हिजण मीडियावरील बातम्या पाहून येते आहे. गेल्या चार वर्षात भारतीय टेलिव्हिजण मीडियात विद्यमान सरकार संबंधातील बातम्या पाहून असे वाटते कि आपण कुठला राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट तर पाहत नाहीत. सार काही एवढे आलबेल आहे कि समोरची बातम्या सांगणारी व्यक्ती हि पत्रकार किंवा निवेदक आहे कि केंद्र सरकारचा कुणी प्रवक्ता बोलतो आहे अशी शंका यावी.
   आपल्या अवतीभवती अशी अनेक माणसे असतात कि जी स्थानिक , राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय मुदयावंर आपल्याला तावातावाने चर्चा करताना आढळतात. यातली बहुतेक सर्व मंडळी हि आपली मते हि मुख्यत्त्वे न्युज चॅनेल्स वरील बातम्या पाहून बनवत असते. जर शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ज्या पाण्याच्या टाकीत पाणी साचवते तेच पाणी दूषित असेल तर घराघरात पोहोचणारे ते पाणी पिऊन लोक आजारी पडणारच. न्युज चॅनेल्स च्या बातम्या अगदी एकांगी असल्याने त्या बघून तयार होणारी मते देखील पांगळी  असतात आणि अशी पांगळी मते घेऊन जगणाऱ्या जनतेला आणि त्या जनतेतल्या तथाकथित नेत्यांना बौद्धिक पगळेपण आल्याशिवाय कसे राहील. याचीच प्रचिती आपण सद्याचा विधानसभेच्या अधिवेशनात पाहत आहोत. मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात तिसऱ्यांदा दुष्काळ पडला आहे. शेतीसाठी सोडाच परंतु बहुतेक गावात ऑक्टोबर महिन्यापासूनच पिण्यासाठी पाणी नाही अशा बिकट परिस्थितीत विधानसभा हि आरक्षणाच्या मुद्यावरून गाजते आहे कारण त्या मुद्यात सरकारसाठी आणि विरोधीपक्षांसाठी सत्तेची गणित दडलेली आहेत तार माध्यमांसाठी दडलेला आहे मसाला.
     काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक सारी चॅनेल्स मंदिर मास्जिद्द वाद, संस्कृती रक्षण, राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी मुद्द्यांवर चर्चा सत्र घडवून आणतात. खेडे गावात किंवा शहरातल्या चाळीतून विलुप्त होत जाणारी कचाकचा भांडण्याची कला जोपासण्याचे संस्कृती रक्षणाचे काम हे न्युज चॅनेल्स मोट्या इमानदारीने करतं आहेत. त्यामानाने शिक्षणाचा खालावलेला दर्जा, महाग होत जाणाऱ्या आरोग्य सेवा, शेतकरी वर्गाची ढासळत  जाणारी परिस्थिती, बेरोजगारी यांसारखे प्रश्न त्यांच्या खिजगणतीतही नाही. कारण अशा मुद्यात मसाला नाही, त्या चर्चा बघणारा प्रेक्षक कुठल्याच बाजूचा नसतो. त्यामुळे त्याला माहिती मिळते परंतु त्याचा मनोरंजन होत नाही. त्यातून टी आर पी मिळत नाही. प्रेक्षकाना जे आवडते ते देण्याची वृत्ती या न्युज चॅनेलला मसाला चॅनेल बनविते, बिग बॉस के घर मे क्या हुवा , कपिल के किस्से , किंवा रिऍलिटी चेक याना आपण न्युज म्हणू शकतो का आणि मग प्रेक्षकही न्युज चॅनेल्स हि मनोरंजन म्हणूं पाहतात आणि त्यालाच बातम्या समजतात.
      मीडियाला खासकरून टेलिव्हिजण मीडियाला आपले स्वतःचे एक अर्थकारण आहे आणि जे चोवीस तास चालणाऱ्या चॅनेलसाठी कठीण होऊ पाहत आहेत हे जरी मान्य केले तरी. हि माध्यमे लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहेत. सरकारी योजनां, त्यांचं कामकाजाचे आणि अंमलबजावणीचे तटस्थ विश्लेषन करण आणि त्यातून जनतेसमोर नेमकी बातमी ठेवणे हे या माध्यमाचा मुख्य कामात मोडते. हे देखील तेवढेच खरे आहे. एखाद्या विद्यार्थ्यांचे त्याचा शिक्षकांसोबत चांगले संबंध असू शाकतात. परंतु चांगला अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा देणे हे त्या विद्यार्त्याचे प्रथम कर्तव्य असायला हवे. केवळ आपल्या ओळखीच्या जोरावर विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेत अवघड वाटणारे प्रश्नच टाकू नये यासाठी  दबाव टाकला आणि शिक्षकानेहि अगदी तसेच केले तर. कदाचित तो विद्याथी परीक्षेत चांगले गुण मिळवून हुशार भासू शेकेल परंतु तो हुशार असेलच असे नाही. इतर (मॅनेज न होणाऱ्या) शिक्षकांनी त्याला थोडा देखील कठीण प्रश्न  विचारला तर त्या विद्यार्थ्यांची फजिती होईल. भारतातील विद्यमान सरकार आणि त्यांची बाजू मांडणारा पक्ष या विद्यार्थ्यांसारखा झाला आहे. हे विद्यार्थी एवढे मुजोर आहेत कि तुमचा प्रश्नच कसा चुकीचा आहे हे प्रश्न विचारणाऱ्याला ठणकावून सांगतात. अर्थात असले मुजोर विद्यारथी २०१४ पूर्वीही होते. दीर्घकाळच्या सत्तेतून  आलेला माज आणि मुजोरी याचे जिवंत उदाहरण असेलेले कपिल सिब्बल यांसारखे नेते देशाने यापूर्वीही अनुभवले आहेत आणी त्यातूनच २०१४ चे रामायण घडले आहे. परंतु यावेळी हि मुजोरी प्रश्न विचारणारी प्रणालीच मोडून टाकण्यापर्यंत गेली आहे.
     जे कुणे या प्रकारात समाविष्ट होण्यासाठी नकार देतात त्यांच्यवर शक्य त्याप्रकारे दबाव टाकला जातो. त्यांना सोशिल मीडिया वरून ट्रॉल केले जाते, त्यांच्या बदनामीसाठी सोशल मीडिया आर्मी सज्ज असते. अनेक दशकांपासून पत्रकारितेत असलेले पुण्य प्रसून वाजपेयी , रवीश कुमार, अभिसर शर्मा हि अशीच काही टेलिव्हिजण मीडियातली नावे . हि सर्वच मंडळी काँग्रेस शासनाच्या काळातही सरकारवर टीका करायची त्यांना कठीण प्रश्न विचारायची तेव्हा ते सन्माननीय पत्रकार होते परतू हीच गोष्ट विद्यमान सरकारच्या काळात ते करू लागले तेव्हा त्यांना देशद्रोही म्हणून प्रसारित करण्यात आले. त्यांच्या कार्यक्रमात भा.जा.प च्या प्रवक्त्यांनी जाणे बंद केले. त्यांना काँग्रेस चे चमचे म्हणूंन हिणविण्यात आले. एवढंच पुरेस नव्हते म्हणून कि काय NDTV  च्या प्रसरणावर विद्यमान सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने राष्टीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत एका दिवसाची बंदी लावून पुन्हा काही काळ आणीबाणीची आठवण करून दिली. आणि काही दिवसनपूर्वीच पुण्य प्रसून जोशी याना ABP न्युज चॅनेल मधून बाहेर पडण्यासाठी दबाव आणला गेला या साऱ्या घटना लोकशाहीचा डंका वाजविणाऱ्या शासनाने हुकूमशाही पद्धतीने आमलात आणल्या.
   आम्हाला पूरक असेलेली मते असणारे सर्वच देशप्रेमी आणि थोडा वेगळा विचार मांडणारे , प्रश्न विचारणारे सगळेच देशद्रोही हे कुठेले मापदंड सरकार लावू पाहत आहे कुणास ठाऊक. याच महिन्यात माननीय पंतप्रधान मोदीजींनी मन कि बात या कार्यक्रमचा ५० व्या भागातून जनतेशी संवाद साधला. खरेतर असा संवाद साधण्याची कला आणि रेडिओचा एवढा प्रभावी वापर कुठल्याच भारतिय नेत्याने  केलेला नाही. परंतु याला सवांद म्हणावे का कारण हे उद्बोधन एकतर्फी असते. मन कि बात या कार्यक्रमातून , गणतंत्र दिवस आणि स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून ,अनेक सभा संमेलनातून माननीय पंतप्रधानांनी जनतेशी यापूर्वी कुणीही साधला नसेल एव्हढा सवांद साधला आहे. परंतु या चार वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही आणि ज्या काही दोनचार मुलाखती न्युज चॅनेल्स ला दिल्या त्या कुणाला दिल्या आणी त्यातील प्रश्न कुतूहल असेलल्या वाचकांना youtube वर सहज बघायला मिळतील.
    सरकारच्या निती योग्य आहेत कि अयोग्य , कारभार पारदर्शक कि अपारदर्शक , कार्यकाळ समाधानकारक कि असमाधानकारक हा माझा लेखनाचा विषय नाही, तेव्हढा माझा अभ्यास नाही आणि काही मत असलीच तर ती माझी वैयक्तिक  मते आहेत. परंतु ती मते मी आणि माझ्यासारखे सामान्य माणसे ज्या माध्यमातून बनवितात त्या माध्यमांची गळचेपी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कदापि मान्य होणार नाही. हीच घुसमट या लेखामागची प्रेरणा आहे.
    बऱ्याच वाचकांना असा प्रश्न पडला असेल कि तुम्ही या सरकारलाच का दोष देता. मागील ६० वर्षात काँग्रेस ने जे केले त्या बद्दल तुम्ही का नाही बोलत . तर त्या सर्व मित्रांना मी सांगू इच्छितो कि समजा तुम्ही शान हा चित्रपट पाहत आहात. हा चित्रपट चालू असताना  चित्रपटाचा नायक अमिताभ बच्चन अचानक शानच्या  फ्रेम मधून बाहेर पडून शोलेच्या फ्रेममध्ये शिरून गब्बरसिंगला हाणत नाही. चित्रपट जर शान असेल तर गोष्ट हि शान मधल्या शाकालचीच व्हायला हवी शोले मधल्या गब्बरची नाही म्हणून सध्या देशातील विद्यमान सरकारलाच प्रश्न विचारले जातील . तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांवर किंवा केलेल्या टीकेवर तुम्ही काँग्रेस च्या काळात कुठे होतात हा प्रश्न उत्तर होऊ शकत नाही. काँग्रेस शासनाच्या काळातही दबावतंत्राचा वापर होतहोताच परंतु माध्यमांच्या मुस्कटदाबीचा जो प्रकार विद्यमान सरकार चालवते आहे त्यातून पुढे इतर पक्षही धडा घेणार नाहीत हे कशावरून.
    बट्राड रसेल यांचं एक अप्रतिम वाक्य आहे . ते म्हणतात In democracy the fools have right to vote & in dictatorship the fools have right to rule. आपल्या सुदैवाने आपल्या पूर्वजांनी पहिल्या प्रकारची शासनव्यवस्था स्वीकारली आहे. ज्यात कुणी मुर्ख असो कि हुशार प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार आहे आणि राज्यकर्त्यांना प्रश्न विचारून आपले मत बनविण्याचा अधिकार आहे . परंतु  कुणी  जर तुमच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारावरच गंडांतर आणत असेल तर ...
  मुझे मालूम नहि के हिंदू खतरेमे है , या मुसलमान खतरे मे है   
  अगर सवाल पुच्छना मना है तो जरूर इन्सान खतरे मै है  

No comments:

Post a Comment

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...